जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा नुकताच निकाल लागला असून पिंपळगाव काळे येथील जे.बी.पटेल कनिष्ठ महाविद्यालयाने १००%टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे.
विज्ञान शाखेतून ४७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीमध्ये २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विज्ञान शाखेचा निकाल १००%लागला आहे.कला शाखेतून १६ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले कला शाखेचा निकाल ८७.५०% लागला आहे तर वाणिज्य शाखेतून ३ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे त्यापैकी प्रथम श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे वाणिज्य शाखेचा एकूण निकाल १०० टक्के लागला आहे एकूण महाविद्यालयाचा निकाल ९७% लागला आहे.
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष ॲड. सलीम बापूमिया पटेल, तसेच सहसचिव रब्बानी देशमुख,संचालक कय्युम पटेल, सिराजोद्दीन पटेल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शोएब यांनी अभिनंदन केले.
Add Comment