बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा

पाणीपुरवठ्यासाठी डफडे वाजवत ग्रामपंचायतवर मोर्चा.

Spread the love

काँग्रेसच्या आंदोलनाला ग्रामस्थांची साथ.

दुसरबीड | समर्थ भारत मराठी :

स्थानिक ग्रामपंचायतच्या हद्दीत कित्येक महिन्यापासून पाणीपुरवठा झालेला नाही.ऐन उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.यासाठी काँग्रेस कमेटीच्या वतीने दिनांक ३ मे रोजी ग्रामपंचायत प्रशासनाने आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता.त्या अनुषंगाने काँग्रेस कमेटीच्या वतीने गावातून डफडे वाजवत मोर्चा थेट ग्रामपंचायत कार्यालयावर नेण्यात आला. लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

दुसरबीड ग्रामपंचायतला १० कोटी रूपये किंमतीची ‘जल जीवन मिशन’ द्वारे पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे. सात वर्षे उलटूनही कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे हि योजना अपुर्ण आहे. मे महिन्यात ग्रामस्थांना होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता मांडवा धरणावरील पाईपलाईन दुरूस्ती तसेच खडकपुर्णा नदीतील जुनी विहीर खोलीकरण,आडवे बोअर घेणे किंवा गावाशेजारी असलेल्या विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव शासनाकडे नोव्हेंबर, डिसेंबर मध्येच दिले असते तर आज पाणीटंचाई निर्माण झाली नसती. त्यामुळे येथील वार्डात मागील दीड वर्षापासून तर काही वार्डात मागील तीन महिन्यापासून पाणीपुरवठा झालेला नाही. काँग्रेसच्या वतीने गावातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा यासाठी निवेदन देण्यात आले होते.यामध्ये आठवडाभरात पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायत प्रशासन जागे झाले नाही. बेजबाबदार ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आणण्याकरिता काँग्रेसने डफडे बजाव आंदोलन करत थेट ग्रामपंचायत वर धडक दिली.

ग्रामस्थ व महिलांनीही काँग्रेसच्या या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल असे आंदोलना दरम्यान ग्रामसचिव यांनी सांगताच आंदोलन धारकांनी टँकरने पाणीपुरवठा न करता पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा व तशी ग्वाही देण्यात यावी तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. दोन तासानंतर सचिव टि.जी.चौधरी यांनी संबंधित कंत्राटदार व इंजिनियर यांना दूरध्वनीवरून संपर्क करत २५ मे पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. 

यावेळी आंदोलनात कॉंग्रेसचे जुनेद अली, सुनील जायभाये, गजानन जायभाये, कचरुजी भारस्कर,शेख रहेमान,अर्जुन घुगे,फौजी तनवीर शेख,अनीस शेख,साबीर पठाण, शहेजाद पठाण, वाघ, अदीम पठाण, हलीमखा पठाण,अनील सांगळे, जुनेद टेलर,बंडु सांगळे,सुखदेव सांगळे,शिवाजी कानडे,माजी सैनिक रफीक शेख,कडुबा पवार,प्रकाश केवट,सत्तार शेख,शेख मोईन,लतिफ शेख,अमीर शेख, मजर शेख, मुजीब शेख यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या.यावेळी किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवाडे यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

error: Content is protected !!