देऊळगावराजा | समर्थ भारत मराठी :
मतदार संघात कधी दुष्काळी परिस्थिती तर ओला दुष्काळ सतत डोके वर काढत असतो त्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडून गेल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.अगोदर पावसाअभावी नदी,नाले,विहीरी कोरड्या पडल्या आहेत.शेतकऱ्यांनी अत्यल्प पाण्यात पिके जगवली. दि.२६ रोजी रात्री गारपीट झाली,वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पाऊस व गारपिटीने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.त्यामुळे भल्या पहाटे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आ.डॉ शशिकांत खेडेकर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले व दिलासा दिला. झालेल्या नुकसानाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.जिल्हाधिकारी,जिल्हाकृषी अधीक्षक,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,कृषी अधिकारी यांच्याशीही दूध्वनीवरून संपर्क करून गारपिटीची माहिती त्यांना दिली व सरसगट पंचनामे करण्याची सूचित केले.
देऊळगाव राजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस व गारपीट झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वे करून त्यांना तात्काळ सरसकट मदत करावी अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव व माजी आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी केली. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात पाऊस पडणार असल्याचं संकेत दिले होते त्यामुळे बळीराजा सतर्क होता मात्र या अवकाळी पावसामुळे द्राक्ष,मका,हरभरा,कांदा,ज्वारी,बाजरी,गहू यासह अनेक फळभाज्या व विशेष करून शेडनेट मधील पिकांना तडाखा बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
“शेतकरी अनेक संकटाचा सामना करत जीवन जगत आहे. आधी खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. शेतकरी रब्बी पिकाच्या आशेवर होता मात्र हाती तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा देणे गरजेचे आहे.”
डॉ.शशिकांत खेडेकर(माजी आमदार)
यावेळी ऋषी जाधव(युवा सेना जिल्हाप्रमुख),दीपक बोरकर (उपजिल्हाप्रमुख),तहसीलदार वैशाली डोंगरजाळ,अनिल चित्ते(तालुकाप्रमुख),श्रीनिवास खेडेकर(युवा सेना जिल्हा सरचिटणीस),शिवाजी कुहिरे(युवा सेना),राजेश सपाटे,दीपक पवार यांनी किन्ही पवार,पांग्री,सिंनगावजहागीर,वानेगाव,गारगुंडी,मेहुणाराजाटाकरखेड भागिले,आळंद,गोंधनखेड,पिंपळगाव बु, निमगाव गुरु,रोहणा,वाघजाई,जळगांव,पिंपळखुटा या गावांमध्ये जाऊन पाहणी केली.
Add Comment