Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

उपवधू – वर व पालक परिचय मेळावे होणे ही काळाची गरज – आ. डॉ. संजय कुटे.

Spread the love

जळगाव जामोद | समर्थ भारत मराठी :

आजच्या परिस्थितीत मुला – मुलींचे लग्न जुळवणे हे फारच जिकीरीचे काम झाले आहे. पैसा, वेळ व योग्य स्थळाची निवड करण्यासाठी उप वधू- वर परिचय मेळावे होणे ही आज काळाची गरज आहे.माझ्या मतदारसंघात जवळजवळ सर्वच जातीचे मेळावे होतात.मी बहुतेक सर्वच ठिकाणी उपस्थित राहून त्यांचा आनंद व्दिगुणित करीत असतो.योग्य उपवर-वधूची निवड अशा मेळाव्यात उत्तम होते,असे प्रतिपादन आ.डॉ.संजय कुटे यांनी उद्घाटक पदावरून जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याच्या वतीने आयोजित तेली समाज राज्यस्तरीय भव्य मोफत उपवधू – वर परिचय मेळावा व सोयरीक पुस्तिकेच्या विमोचन प्रसंगी काढले.

नगरपरिषद सांस्कृतिक भवन जळगाव जामोद येथे झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आ.डॉ.संजय कुटे तर अध्यक्ष स्थानी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अॕड.रोहिणी खेवलकर होत्या. तर वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक  महासभा नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य,भाजपा महिला आघाडी अमरावती च्या जिल्हाध्यक्षा अनिता खेवलकर,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभागीय युवक आघाडी अध्यक्ष प्रवीण बावनकुळे,अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड.देवाशिष काकड, अमरावती महिला आघाडी जिल्हा सरचिटणिस प्रणिता शिरभाते विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन व श्री संताजी महाराजांच्या पूजनाने झाला.त्यानंतर सोयरीक पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.विचार मंचावरून मान्यवरांनी उपवर वधू-वर यांना भविष्याची दिशा दाखवत आपले विचार मांडले. 

“आपल्या मुला मुलींना वाढवताना आई-वडिलांनी आपले सुख बाजूला ठेवत त्यांना मोठे करतात, शिक्षण देतात, संस्कार करतात.त्यांच्या सुखासाठी अहोरात्र झटतात. आपल्या आपत्यांचे भविष्य सुखात जावो,आनंदात जावो, म्हणून प्रयत्न करतात.त्यांच्या कष्टाची जाण ठेवत मुला-मुलींनी आई-वडिलांचे संस्कार जपावे.”

(अॕड. रोहिणी खेवलकर)

या मोफत उपवर वधू वर पालक परिचय  मेळाव्यात १९८ उपवर तर ८४ उपवधूंनी आपल्या नावाची नोंदणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक समितीचे सचिव अनिल भगत तर संचालन प्रगती भगत यांनी व आभार समितीचे प्रसिध्दी प्रमुख अनिल धनभर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती तथा जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!