समर्थ फार्मसी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन.
देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :
विद्यार्थ्यांनी नेहमीच उरी जिद्द आणि संयम बाळगायला हवा.त्यातूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये यशाच्या उंच शिखरावर पोहचू शकतो, शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांनी कोणत्या वर्षी कोणत्या विषयावर फोकस करायचा हे ठरवले पाहिजे असे स्वप्न बघायचे की जे स्वप्न झोप येऊ देत नाही,तेव्हा कुठे आपण जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ.मिलिंद उमरेकर यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले.
श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था द्वारा संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये वार्षिक स्नेहसम्मेलन औरा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. स्नेहासम्मेलनाचे उदघाटाक डॉ.मिलिंद उमेकर व अध्यक्षस्थानी देवानंद कायंदे हे होते.यावेळी महाविद्यालयाच्या सचिव नंदाताई कायंदे, सतिष कायंदे, मनोज कायंदे, वर्षा कायंदे, प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे,समर्थ ऍग्री चे प्राचार्य डॉ. नितीन मेहत्रे, डॉ. गोपालकृष्ण सीताफळे,डॉ. पुरुषोत्तम लड्डा उपस्थित होते.कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रथम महाविद्यालयाच्या मॅक्सिन स्कोप मॅट्रिक्स चे प्रकाशन करण्यात आले, तसेच डॉ. लड्डा यांनी लिहिलेल्या फार्मासुटीकल स्टॅटिक्सटिक या विषयाच्या पुरस्काचे प्रकाशन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य डॉ. ताठे सरांनी सर्वांना महाविद्यालयाची ओळख करून दिली तसेच महाविद्यालयाचा २०१९ पासून चा प्रवास मान्यवरांसमोर मांडला. नंतर डॉ. सीताफळे सर यांनी महाविद्यालयाचा मागील वर्षाचा प्रगती अहवाल सर्वांसमोर सादर केला. अध्यक्षस्थानावरून बोलतांना देवानंद कायंदे यांनी विद्यार्थ्यांना संभोधित करतांना सांगितले की, आपल्या आयुष्यात प्रवास करतांना प्रत्येकाने आपल्या समोर आपले ध्येय निश्चित करून चालावे.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. किशोर चराटे यांनी केले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन राजश्री वाघ व गणेश गावडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Add Comment