Agriculture News देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

देऊळगाव राजात निघाला गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा.

Spread the love

●शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अन्यथा परिणामाला सामोरे जा : प्रमोद घोंगे●

देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देऊळगाव राजात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी प्रमोद घोंगे यांनी केली.

चक्रीवादळ व गारपिटीने शेतीपिके, शेडनेट, जनावरांचे गोठे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यानंतर शासन प्रतिनिधी,पालकमंत्री,आमदार,खासदार यांनी पाहणी दौरे केले. महसूल यंत्रणेने पाहणी करून नुकसानीचे अहवाल शासनास सादर केल्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली.परंतु यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील १२५० शेडनेट धारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तरी शेडनेट बाबत मदतीची घोषणा केलेली नाही.गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्यात यावी,ज्या शेतकऱ्यांच्या गोठ्यांची पडझड झालेली आहे त्यांना ६०हजार सानुग्रह मदत देण्यात यावी,शेडनेट धारक बिज उत्पादक शेतकऱ्यांना १लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे,२०२२ च्या अतिवृष्टी मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ खात्यामध्ये मदत जमा करण्याचा यावी,पोखरा योजनेचा विस्तार करावा. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत देण्यात आले. उपरोक्त मागण्यांवर १५ दिवसांत कार्यवाही न केल्यास गारपीटग्रस्त गावातील सर्व शेतकरी शासकीय कार्यालयासमोर साखळी उपोषनाचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला.

 या शेतकरी मोर्चासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रमोद घोंगे पाटील,जिल्हा उपाध्यक्ष बबनराव बुरकुल,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल भट, सरचिटणीस सुनिल झोरे,कार्याध्यक्ष जनार्दन मगर , विधानसभा सरचिटणीस संभाजी मुद्गुल,निमखेडचे सरपंच संजय कव्हळे,युवक कार्याध्यक्ष सचिन कोल्हे,अरुण मोगल, असोल्याचे माजी सरपंच शरद मांटे,गिरोलीचे सरपंच राजु म्हस्के,गोळेगावचे सरपंच दत्ता कोल्हे,शहर अध्यक्ष विजय खांडेभराड,बाबासाहेब बंगाले,तुळजापुरचे सरपंच मनोहर कोल्हे,रतन शेळके,उपसरपंच परमेश्वर कव्हळे,दत्ता कोल्हे, काकासाहेब कव्हळे,सुदाम कव्हळे, शरद घोंगे पाटील,विष्णू तिडके,संजय कव्हळे,विष्णु घोंगे पाटील,मधुकर भुतेकर, नामदेव घोंगे पाटील,योगेश घोंगे पाटील,बालाजी सोसे, मनोहर झिने,तुकाराम कव्हळे,रामेश्वर कव्हळे,भागवत कोल्हे,संतोष घोंगे पाटील,दिलीप कोल्हे,गोविंद घोंगे पाटील,उध्दव शेरे,बाबासाहेब शिंदे,योगेश घोंगे पाटील, परमेश्वर शिंदे,लहू घोंगे पाटील यांच्यासह बहूसंख्य शेतकरी उपस्थित होते.

◆प्रमोद घोगे यांचे नेतृत्व हाणून पाडण्याचा प्रयत्न.◆

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर पक्षात दोन गट पडले.मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे.मतदार संघाचे आ. डॉ. राजेंद्र शिंगणे हे अजित पवार यांच्या गटासोबत गेल्याने, प्रमोद घोंगे यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याला पसंती दिली.शासकीय उच्चपदाची नोकरी सोडून प्रमोद घोंगे यांनी राजकीय व सामाजिक कार्य सुरू केले.परिसरातील एक अभ्यासू व प्रामाणिक नेता म्हणून त्यांची ओळख असतांना त्यांनी पुकारलेल्या आक्रोश मोर्चाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असतांना पक्षातील काही स्वकियांनीच त्यांच्या आंदोलनातील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला.मात्र शेतकरी मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चा सहभागी झाले होते.

error: Content is protected !!