जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
तालुक्यातील आसलगाव सब स्टेशन अंतर्गत गोळेगाव खुर्द, सावरगाव येथील शेतकऱ्यांनी दि.२ रोजी सकाळपासून आसलगाव येथील सब स्टेशनवर आठ तास वीज पुरावठ्यासाह रोहित्रांच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करत मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहणाचा इशारा दिल्याने प्रशासन हादरले.
नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.तर दुसरीकडे शेतकरी रब्बी पिकाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.परंतु रब्बी पिकाला सिंचनाची सुविधा शेतकऱ्यांकडे असूनही वीज वितरण च्या ढेपाळलेल्या कारभारामुळे सिंचनाअभावी शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत.यामुळे आसलगाव सब स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोडेगाव खुर्द व सावरगाव येथील शेतकऱ्यांमध्ये महावितरण विरुद्ध तीव्र रोष होता.सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने हातातोंडाशी आलेली हरभरा, गहू,ज्वारी,कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे.त्यामुळे सबस्टेशन अंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच सब स्टेशन समोर दिवसाला ८ तास नियमित वीज पुरवठा देण्यात यावा,२२ जुलैला झालेल्या महापुरामुळे विजेच्या खांबांचे व इतर कामे त्वरित करावी,जळलेली रोहित्र तातडीने बदलून मिळावी,अतिरिक्त भार असलेल्या रोहित्रांच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्र बसवून द्यावे या मागण्यांसाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतला संध्याकाळपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा सुद्धा प्रशासनाला दिला.शेतकऱ्याच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी युवा सेना तालुका प्रमुख अमोल दाभाडे यांनी या आंदोलक शेतकऱ्यांच्या मागन्या भ्रमणध्वनीद्वारे खा. प्रतापराव जाधव यांना माहिती देऊन महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सोमवारपासून सर्व रोहित्र दुरुस्त करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी सूचना देताच शेतकऱ्यांनी तूर्तास आंदोलन स्थगित केले.यावेळी निलेश खुपसे, रुस्तम दाभाडे, बाळकृष्ण दाभाडे ,रामदास नागपुरे, गजानन सातव, आशिष पाटील, विजय शेगोकर, सुनील भिवटे, विजय भिवटे उपस्थित होते.
Add Comment