Maharashtra crimes देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकविणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई : संतोष महल्ले

Spread the love

देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :

सध्याच्या काळात प्रत्येकजण हुशारी दाखवत सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतो.त्यात मेसेज फॉरवर्ड करण्यात अनेकांचा हातखंडा आहे. धार्मिक, राजकीय, जातिय,देशविरोधी विषयांवर तर सेकंदात हे वापरकर्ते व्यक्त होतात.मात्र या मीडियाचा वापर दक्षता बाळगुन न केल्यास व कोणत्याही पोस्टला लाईक, शेअर आणि धार्मिक भावना भडकविणारे मेसेज फॉरवर्ड केल्यास  अंगलट येऊन ‘करिअर खराब’ होऊ शकते व ‘जेल ची हवा’ लागण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे सोशल मिडियाचा वापर जरा जपूनच वापरा असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष महल्ले  यांनी केले आहे.

सध्या राज्यात विविध जातीय,धार्मिक व आरक्षणांच्या मुद्यांवर भडकाऊ भाषणे करून युवकांची माथी भडकविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विशेष आयटीच्या छुप्या सायबर टिम कार्यरत असुन त्यांच्याकडुन विविध जातीधर्माच्या विरोधात बदनामीकारक मॅसेज तयार करणे तसेच नेते मंडळींच्या विरोधात आक्रमक पवित्रा निर्माण होईल असे मॅसेज बनवून व्हायरल केले जातात. त्यावर कोणताही विचार न करता व मॅसेजची खात्री न करता तातडीने प्रतिक्रिया देत ते शेअर करत आपण सर्वांपेक्षा किती अपडेट आहोत हा दाखविण्याचा केविलपणा युवकांकडून केला जातो. परंतु या मीडियावर काही समाजभान नसलेले आणि विघ्नसंतोषी लोकांचाही मोठा भरणा असल्याने ही मंडळी जहाल,तीव्र,भडक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शांतता भंग करणाऱ्या, पोस्टच शेअर करण्यावर अधिक भर देतात.यातील एकही पोस्ट तुमच्याकडून चुकून नकळत अनावधानाने असो की भावनेच्या भरात शेअर केली जाते अन् त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते.

सध्या सोशल मीडियाच्या जगात पोस्ट, लाइक्सची चढाओढ आहे. त्या नादात चुकीची माहिती शेअर होण्याचे प्रकार होतात.आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,परंतु येथे व्यक्त होतांना त्याच्या परिणामांचा विचार केला जात नाही.त्यातून अफवा पसरतात,गैरसमज होतात.सोशल मीडियाचा वापर विधायक कामांसाठी केला तर तो नक्कीच चांगला आहे.मात्र त्यातून अनेकदा विध्वंसक कृत्येही केली जातात. त्यामुळे सोशल मिडियावर आलेल्या पोस्टची खात्री करूनच ते लाइक्स कमेंट्स व फॉरवर्ड करावे अन्यथा ‘अतिघाई संकटात नेई’ म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.कुणाची बदनामीकारक, धार्मिक भावना दुखावणारा, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारा मेसेज सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक गुन्हे घडत आहेत.त्यामुळे व्हॉट्सअप,ट्विटर व फेसबुकवर संवेदनशील माहिती टाकल्यास अथवा ती शेअर केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो.

“सोशल मीडियावरील कोणत्याही प्रकारचे धार्मिक भावना दुखावतील, तसेच वादग्रस्त पोस्ट वापरकर्त्यांनी करू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण अथवा जवळचे कोणीही त्यात सहभागी होऊ नये याची खबरदारी घ्यावी.सोशल मीडियाचा वापर योग्य ती दक्षता बाळगुनच करावा.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे मेसेज फॉरवर्ड करू नये.वादग्रस्त पोस्टकडे पोलिसांचे लक्ष असुन अशा घटना निदर्शनास येताच कायदेशीर कारवाई केली जाईल.”

पोलीस निरीक्षक संतोष महल्ले

error: Content is protected !!