आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे प्रयत्नांना यश.
देऊळगाव मही|समर्थ भारत मराठी :
गेल्या काही दिवसापासून बळीराजा विविध समस्यांना तोंड देत जीवन जगत आहे.बळीराजाला आधार देणे शेतकऱ्यांची एक संस्था म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्य आहे.त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना कापुस हमी दराने विक्री करता यावा यासाठी माजी मंत्री आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नाने देऊळगांव राजा येथे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सिसिआय) चे कापूस खरेदी केंद्र मंजुर झाले असुन देऊळगांव मही येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.आज पर्यंत बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवले आहे.येणाऱ्या काळात देखील शेतकरी हिताचेच पाऊल बाजार समितीच्या माध्यमातून उचलण्याचा प्रयत्न असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे यांनी यावेळी सांगितले.
देऊळगाव मही येथे कापुस खरेदी केंद्राच्या उदघाटन प्रसंगी बायगाव बु येथील शेतकरी भास्करराव आघाव यांनी कापुस विक्रीसाठी आणला होता त्यांचे कापसास हमी भावानुसार ७०२०/- रुपये भाव देण्यांत आला.
यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार समितीचे सभापती समाधान शिंगणे यांनी शाल श्रीफळ व हार घालुन केला व त्यानंतर काटापुजन करुन कापुस खरेदीस सुरुवात करण्यांत आली. सिसिआई चे ग्रेडर डहाके यांनी ओलावा तपासुन शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी केली.
देऊळगांव मही येथे दररोज सुटटीचे दिवस,रविवार वगळता कापुस खरेदी करण्यांत येणार असुन शेतकरी बांधवांनी हमी भावाने कापुस विक्रीसाठी अद्यावत ७/१२ उतारा ज्यामध्ये कापुस पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. आधार कार्ड व मुळ कापुस उत्पादक शेतकरी विक्रीसाठी उपस्थीत असणे आवश्यक आहे.कापूस खरेदी शुभारंभ प्रसंगी समिती संचालक मंडळ, देऊळगांव मही येथील प्रगतशिल शेतकरी माजी सरपंच अनंता इंगळे,भरत शिंगणे, श्रीकृष्ण शिंगणे,सचिव किशोर म्हस्के व कर्मचारी वृंद उपस्थीत होते.
शेतकरी बांधवांनी देऊळगांव मही कापुस खरेदी केंद्रावर कापुस विक्रीसाठी चांगल्या प्रतीचा कापुस आणावा, भिजलेला कापुस आणु नये.ऑनलाईन नोंदणीसाठी ७/१२ उताऱ्यात कापुस पिकाची नोंद असावी व आधार कार्ड सोबत आणावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे व संचालक मंडळाने केले आहे.
Add Comment