देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

अन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात झाला “अरुणोदय”

Spread the love

मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचा पुढाकार.

देउलगाव राजा | समर्थ भारत मराठी : (सुनील मतकर)

देऊळगाव राजा नगरपालिकेचा अमृत महोत्सवी वर्ष  सुरू आहे.या दरम्यान नगरपालिकेला अनेक नावाजलेले अधिकारी येऊन गेले,अनेक नगराध्यक्ष देखील होऊन गेलेत.नगरपालिकेला कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक सेवा दिली. सेवानिवृत्तीच्या नंतर नगर परिषदेला त्या कर्मचाऱ्यांचा विस्मरण झालं.ज्या कर्मचाऱ्यांनी पालिकेला सेवा दिली त्यांचा सन्मान करण्याचे नियोजन नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले.नगरपालिकेत बरेच मुख्याधिकारी येऊन गेले मात्र एकाही अधिकाऱ्याने अशी कृतज्ञता दाखवली नाही.मात्र अरुण मोकळे यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्रित करून त्यांचा गौरव केला. हा भावनिक प्रसंग पाहून अनेक कर्मचाऱ्यांना गहिवरून आले.तर त्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले एक प्रकारे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात अरुणोदय केला आहे.   अधिकारी येतात आणि जातात,आपला ठरलेला कार्यकाळ पूर्ण करायचा आणि बदली झाली की पुढे निघून जायचे असा काहीसा अधिकाऱ्यांचा जीवनक्रम असतो.मात्र एखाद्या व्यक्तीला आपल्या कर्तव्याशी इमान राखून  आपल्या पदाच्या माध्यमातून अठरापगड जातीला आपण न्याय देऊ शकतो हे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी बालाजी नगरीला दाखवून दिले आहे.

अभ्यासू व परिश्रमी अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी ठसा उमटविला असून देऊळगाव राजा नगरपालिका ऐतिहासिक विकासाच्या टप्प्यावर आहे. आपल्या कार्यशैलीने मुख्याधिकारी मोकळ यांनी प्रशासनात वेगळी छाप निर्माण केली आहे. हे शहराच्या बदलत्या रुपातून स्पष्ट जाणवत असल्याचे बोलले जात आहे. 

विकासाच्या नवनविन संकल्पना,शहर सौंदर्यीकरणाची आत्मीय तळमळ आणि दूरदृष्टी ठेऊन कामांचा धडाका लावणारे लोकप्रतिनिधी त्यांना जोड म्हणून अभ्यासू आणि परिश्रमी अधिकारी असलेले अरुण मोकळ यांचे विकासाचे आणि जनहिताच्या कामांचे सूर जुळले आणि शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यास सुरुवात झाली.प्रमुख चौकांचे सौदंर्यीकरण हे सर्व डोळे दिपवून टाकणारे काम अरुण मोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रत्यक्ष देखरेखीखाली सुरु आहे.पुढे त्यांच्यावर मुख्यप्रशासक म्हणुनही त्यांच्याकडे जवाबदारी मिळाली.शहरात कोवीड काळात केलेले उल्लेनीय काम,प्लास्टिक कॅरीबॅग वापराबाबत कारवाई,अतीक्रमण,सास्कृतीक कार्यक्रम असो शिवाय आरोग्य विषयक उपक्रम,स्वच्छ देऊळगाव राजा हरित देऊळगाव राजा,डिजिटल सेवा प्रणाली,गुदमरलेल्या झाडांची मोहीम यासह इतर लक्षवेधी उपक्रम त्यांनी शहरात राबवून आपल्या कामचा ठसा उमटविला आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न मुख्याधिकारी अरुण मोकळे यांनी केला आहे.

“अधिकारी म्हटलं की त्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ हा ठरलेला असतो. या कार्यकाळात त्या अधिकाऱ्याने आपल्या पदाला कसा न्याय दिला? त्या पदाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या कशा सोडवल्या? याचे मूल्यमापन जनता करत असते.मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता अनेक धनदांडग्यांचे अतिक्रमण जमीनदोस्त केले त्यामुळे शहराचा कोंडलेला श्वास मोकळा झाला.शहराचं मोठ्या प्रमाणात सौदर्यीकरण झाले आहे. त्यांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे नागरिकांच्या कायमस्वरूपी स्मरणात अरुण मोकळ हे नाव सदैव राहील एवढे मात्र निश्चित.”

error: Content is protected !!