Education जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

विद्यार्थ्यांनी जल,जमीन,जंगलची कास धरत पर्यावरण जपावे- मनजितसिंग शिख

Spread the love

जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :

विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती द्वारा संचलित मातोश्री नथीयाबाई विद्यालय आणि इंग्लिश मिडीयम स्कूल, सुनगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना सालाईबन उपक्रमाचे व तरुणाई फाउंडेशनचे मंजितसिंग शिख यांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरण जपत हिरवाई वाढवण्याची कास धरावी आणि अभ्यासासह पर्यावरण जपावे हे आपले मत व्यक्त केले. शाळेचे अध्यक्ष करत असलेल्या प्रयत्नांचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा तसेच शाळेतील विद्यार्थी आणि तरुणाई फाउंडेशन यांनी एकत्र काम करावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.शाळेचे अध्यक्ष प्रा. डॉ. कुलदीपसिंह राजपूत यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी कटिबध्द असल्याचे मनोगतात व्यक्त केले. यावेळी डॉ. कुलदीपसिंह यांनी शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी स्व. डोंगरसिंह राजपूत आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये ‘संविधान वर्ग’ सुरू करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थ्यांच्या साक्षीने ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध संस्कृतीक व देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केले. यामध्ये प्रामुख्याने मुलींचा उत्साह व पुढाकार दिसला. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना स्व. देवीसिंह शेखावत अवॉर्ड फॉर एक्सलंस, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार, स्व. दर्यावसिंह राजपूत इंग्रजी भाषा प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले. तसेच विविध विषयात यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मंजितसिंग व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर संस्थचे स्थानिक अध्यक्ष प्रा. डॉ. कुलदीपसिंह राजपूत, शाळेचे मुख्याध्यापक संजय इंगळे, सरपंच रामेश्वर अंबड़कार,महादेवर धुर्डे, प्रकाशसिंह राजपूत, पालक प्रतिनिधी बळीराम वंडाळे ,विनोद अंदुरकर, अर्जुन ढगे, अमोल चवटकार, सैनिक पंकज केदार, गजानन ताडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय इंगळे, संचालन घोटेकर मॅडम,आभार प्रदर्शन खवले मॅडम यांनी केले.यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहून मंत्रमुग्ध होत मुलांना विविध बक्षिसे दिली.कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!