जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :
तालुक्यात प्रतिष्ठेची ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या आसलगाव ग्रामपंचायत मध्ये दि.५ रोजी उपसरपंच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि युवा आघाडी च्या पुरस्कृत उमेदवार सिंधुताई समाधान गिरी यांचा विजय झाला असून त्या उपसरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.

गेली ३ वर्षे आसलगांव ग्रामपंचायत उपसरपंच पदावर गणेश गजानन गिऱ्हे हे होते.त्यांनी ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपला राजीनामा ठरलेल्या प्रमाणे वेळेवर देऊन आपला शब्द पाळला त्यामुळे उपसरपंच पदाची निवडणूक लागली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप युवा आघाडी अशा दोन आघाड्यांचे उमेदवार रिंगणात उतरले त्यामध्ये महाविकास आघाडीकडे ९ सदस्य होते तर भाजप चे ४ सदस्य आणि युवा आघाडीचे ४ सदस्य असे मिळून ८ सदस्यांमधून १ उमेदवार म्हणजेच सिंधुताई समाधान गिरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.त्यामध्ये सिंधुताई समाधान गिरी यांना एकूण ९ मते मिळाल्यामुळे त्या उपसरपंच पदी विराजमान झाल्या.
भाजप युवा आघाडीच्या उपसरपंचाची निवड झाल्यामुळे गावांमधील भारतीय जनता पार्टी आणि युवा आघाडी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.निवडणूक यशस्वी करून यश मिळवण्यासाठी विजय तिवारी,आ.डॉ. संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा तसेच परीक्षेत ठाकरे,राम इंगळे व युवा आघाडी चे राजू भोंगाळे,रुपेश वानखडे,सुनील डीवरे,गोपाल टापरे,गणेश गिर्हे यांनी परिश्रम घेतले.
Add Comment