Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

श्री.ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत “माऊली सहकार पॅनल”चा दणदणीत विजय.

Spread the love

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

श्री.ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीमध्ये माऊली सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.

माऊली सहकार पॅनल चे आधीच तीन संचालक अविरोध विजयी झाले होते तर सर्वसाधारण मतदारसंघात ०६ जागांसाठी तर महिला राखीव ०२ जागा अश्या ०८ जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.यावेळी १ हजार १९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.निवडणुकीमध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून विद्यमान अध्यक्ष ओमप्रकाश सिताराम राठी यांना ९४९ मते मिळाली असून विद्यमान संचालक सचिन पंजाबराव देशमुख यांना सर्वाधिक १०३० मते मिळाली.सर्वसाधारण मतदारसंघात विशाल विनायक भगत ९२७, अरुण तुकाराम खिरोडकर ९१४, मोतीलाल ओंकारदास राठी ८६२, शंकर नारायण ताडे ८९० मते घेऊन विजयी झाले आहेत.महिला मतदारसंघातून अनिता चंद्रकांत जयस्वाल ९२७, ज्योती सुरेश राजपोपट ८३० मते मिळवून विजयी झाल्या आहेत.

इतरमागासवर्गीय मतदार संघातून कैलास डोबे, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून हरिदास माटे तर विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून वर्षा नितीन गिरी हे तीन संचालक यापूर्वीच अविरोध निवडून आलेले आहेत. सर्वसाधारण मतदार संघातून अतुल कपले १५३, योगेश टावरी ८०, अतुल वानखडे ३८६ तर महिला राखीव मतदारसंघातून जयमाला वानखडे यांना ३६८ मतांवर समाधान मानावे लागले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एम. ए.कृपलानी यांनी तर सह्ययक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक धर्माळ यांनी काम पाहिले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!