जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :
जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील बारी समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन दि.०१ रोजी सादर करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सह संपूर्ण देशात बारी समाज वास्तव्यास असून राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित आहे. समाजाचा आर्थिक शैक्षणिक,सामाजिक व राजकीय विकास व्हावा या दृष्टीने जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याच्या वतीने संत श्री.रूपलाल महाराज यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ सुरू करण्यात यावे. तसेच श्रद्धास्थान असलेल्या श्री.संत रुपलाल महाराजांचे समाधी स्थळ अंजनगाव सुर्जी येथे आहे त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय स्मारकासाठी जमीन व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात यावी.समाजाचा मुख्य व्यवसाय पानवेली,पानपिंपरी व मुसळी पिकविण्याचा आहे. या पिकांना औषधीचा दर्जा देण्यात येऊन संशोधन केंद्र व बाजारपेठ उपलब्ध करून अनुदान देण्यात यावे.बारी समाज हा संपूर्ण राज्यात ओबीसी प्रवर्गात मोडत असून ओबीसीचे सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक व राजकीय आरक्षण समाजाच्या हिताची दृष्टीने अबाधित ठेवण्यात यावे.मुंबई, नागपूर,पुणे,अमरावती,अकोला,बुलढाणा व इतर शहरात बारी समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता वस्तीगृहांची निर्मिती करण्यात यावी.अशा विविध मागण्यांचा निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देण्यात आले.
निवेदनावर श्रीकृष्ण केदार,श्याम डाबरे,बळीराम धुळे,अशोक काळपांडे,अर्जुन घोलप,तुकाराम काळपांडे,बळीराम धुळे, गुणवंतराव कापले,नारायण कोथळकर,कैलास डोबे, शालिग्राम मिसाळ,पांडुरंग मस्के,अजय वंडाळे,गोपाल कोथळकर,पवन अस्वार,रमेश बानाईत यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
Add Comment