Agriculture News Front Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा संग्रामपूर

संग्रामपूर येथे संत्रा प्रक्रीया केंद्राच्या उभारणीला मान्यता.

Spread the love

◆ ९ कोटी १० लक्ष रु.च्या निधीची भरीव तरतूद◆

संग्रामपूर|समर्थ भारत मराठी :

संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी ५५०० हेक्टर एवढया जमिनीवर संत्रा लागवड आहे.येथील शेतकर्‍यांना आधूनिक संत्रा प्रक्रीया उद्योग केंद्राला शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती त्यानुसार जळगांव जामोद मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार २७ डिसेंबर ला सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने जी.आर काढला असून ९ कोटी १० लक्ष रुपयांच्या भरीव निधीची तरतूद केली आहे.

शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जळगाव जामोद मतदार संघाचे शेतकरी पुत्र आ.डॉ.संजय कुटे यांचा हा शेतकरी ड्रीम प्रोजेक्ट आहे.नववर्षे अवघ्या ५ दिवसावर येऊन ठेपले आहे.शासनाने नवर्षाची शेतकऱ्यांना ही भेट दिली आहे.नागपूर,अमरावती जिल्हयातील इतर प्रकल्पा समवेत संग्रामपूर तालुक्यातील ९ .१० कोटी  रुपयांच्या संत्रा प्रक्रीया केंद्राला शासनाने मान्यता दिली आहे. बोले तैसा चाले याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आ.डॉ .कुटे यांनी काम केल्याचे गौरवोद्गार संत्रा उत्पादक शेतकरी काढत आहेत.  

उपमुख्यमंत्री ना. देवेद्र फडणविस यांनी गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात संत्रा प्रक्रीया केंद्र उभारणीचे घोषीत केले होते.आता ते मुर्तरुपात आले आहे.शासन जी.आर मध्ये नमूद संग्रामपूर तालुक्यात संत्र्याच्या सालीपासून कोल्डप्रेस पध्दतीने ऑईल काढणे व संत्रा उप पदार्थावर प्रक्रीया करण्यात येणार आहे.त्यासाठी २००० स्के फुट चे छोटे पॅक हाऊस उभारणी , लहान क्षमतेचे २ .५ मे टन प्रती बॅच प्रिकुलींग युनिट, २५ मे . टन शीतगृह,२.५ मे. टन सॉर्टीग ग्रेडीग व वॅक्सीग लाईन सेमी ऑटोमॅटिक याचा समावेश या प्रकल्पात आहे .

बाजार समिती,शेतकरी गट,सहकारी प्रक्रीया संस्था,शेतकरी उत्पादक कंपनी किंवा खाजगी संस्था हा प्रकल्प १५ टक्के स्वनिधी ८५ टक्के  बॅक कर्ज घेऊन सुरु करू शकतो . संग्रामपूर तालुक्यातील संत्रा फळाचा दर्जा,शेतकरी उत्पादन क्षमता तथा भविष्यात संत्रा पिक वाढविण्यासाठी आवश्यक सुपिक जमिन आहे.तर उपलब्ध मनुष्यबळ प्रक्रीया प्रकल्पाला लागणारी जमिन,रस्ते,वीज व भविष्यात रेल्वे लाईन असे पोषक वातावरण आहे. यासाठी आ.डॉ.कुटे यांनी २ नोव्हेंबर  रोजी प्रत्यक्ष ना.फडणविस यांना पत्र देऊन प्रकल्पाला मान्यता देण्याची मागणी केली होती.त्याची दखल घेत शासनाने उपरोक्त शेतकरी हिताच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.प्राथमिक प्रकल्प उभारणी साठी एकूण खर्च ८ कोटी आहे.तर दुय्यम प्रक्रीया प्रकल्प संख्या २ त्याचा खर्च ४० लक्ष रुपये,उपपदार्थ प्रकल्प संख्या १ खर्च ३० लक्ष रुपये असा एकूण ९ . १० कोटीची रुपयांचा हा प्रकल्प आहे. यामूळे संत्रा फळांचे काढणी प्रश्चात होणारे  अंदाजे २५ ते ३० टक्के नुकसान टळणार आहे .

error: Content is protected !!