प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी केली महत्वपूर्ण चर्चा.
देऊळगाव राजा|समर्थ भारत मराठी :

देशामध्ये ज्यांना अहंकार होता त्यांच्या अहंकाराला संपवण्याचे काम २०१४ साली सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आलेल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे.गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश हितासाठी अनेक निर्णय घेतले. सामान्य माणसाचं सरकार काय असतं? हे आता सर्वजण जगात पाहत आहेत.त्यामुळे आगामी २०२४ च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा महाविजय होणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चे दरम्यान केले.
आगामी निवडणुकीसाठी भाजपचा नवा संकल्प ‘महाविजय २०२४’ असून लोकसभेसाठी ‘मिशन ४५’ तर विधानसभेसाठी ‘मिशन २०० + असा निर्णय भाजपच्या कार्यकारिणीत घेण्यात आला. यासाठी प्रदेश संयोजक या पदाची मोठी जबाबदारी देखील विनोद वाघ यांना देण्यात आली आहे.
अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार होते हे सर्वांनी पाहिले पण या सरकारमुळे महाराष्ट्राची अडीच वर्ष वाया गेली आहेत. अडीच वर्षात सर्वसामान्यांच्या आयुष्यात जे परिवर्तन होऊ शकत होतं ते परिवर्तन करण्याची ज्यांना संधी मिळाली त्यांनी ती घालवली आहे. त्यांनी फक्त स्वतःच्या जिवनात काय परिवर्तन करता येईल यासाठी प्रयत्न केलेत. मात्र आता राज्यात शिंदे-फडणवीस,पवार सरकार आल असुन दोन अडीच वर्षात राज्यातील जनतेसाठी अनेक विधायक निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती विनोद वाघ यांनी दिली.
Add Comment