भा. रा.कॉ. ची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी.
जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी:

जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील कॉम्पुटर टायपिंग च्या परीक्षेसाठी स्थानिक परीक्षा केंद्र देण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता दोन्ही तालुक्यातील विद्यार्थी हे आदिवासी व ग्रामीण क्षेत्रातील आहेत.२२ जुलै २०२३रोजी जळगाव (जामोद) व संग्रामपूर तालुक्यात भयंकर पुरस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे येथील लोकांची शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सर्व विद्यार्थी हे शेतकरी कुटूंबातील असुन त्यांची आर्थिक परिस्थिती सामान्य असल्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना बाहेर परिक्षेस जाणे गैरसोईचे आहे.तरी विद्यार्थी,पालक व संस्था चालक यांच्या मागणी नुसार सदर परिक्षेस स्थानिक परिक्षा केंद्र देण्यात यावे.जेणे करून विद्यार्थी परिक्षेपासुन वंचित राहणार नाही अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदन देतांना काँग्रेस च्या पक्षनेत्या डॉ.स्वाती वाकेकर,तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर,अजहर देशमुख उपस्थित होते.
Add Comment