जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :
जळगांव जामोद शहरातील नागरिकांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषद चे प्रशासक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून दि.१५ रोजी डफडे बजाव आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

२२जुलै रोजी आलेल्या महापुरामुळे नागरिकांच्या घरांची पडझड झाली व घरातील संपूर्ण साहित्य वाहून गेले त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले त्याचप्रमाणे शहरातील छोटे मोठे व्यावसायिकांच्या दुकानातील माल वाहून गेला त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.शेती व त्यातील पिके वाहून गेली या सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांच्या झालेल्या नुकसानाच्या तुलनेत योग्य व पुरेशी नुकसान भरपाई देण्यात यावी.
जळगाव जामोद शहरातील घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे थकीत अनुदानाचे हप्ते विना विलंब देण्यात यावे व नवीन अर्ज स्वीकारण्यात यावे तसेच जुने व नवीन घरकुल लाभार्थ्यांना सहज व सुलभ पद्धतीने अनुदान मिळण्याकरीता प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी.जळगाव जामोद शहरातील घनकचरा संकलन व व्यवस्थापनाचे काम पूर्णतः कोलमडले असून शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे नागरिकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे तरी साफसफाई ची कामे विना विलंब करण्यात यावी.शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत अंगणवाडीची संख्या कमी पडत असून शहरातील प्रत्येक प्रभागात आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाड्याची पूर्तता करण्यात यावी.
उपरोक्त मागण्या संदर्भात दिनांक १५ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.
निवेदन देतांना अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार,ऍड.संदीप मानकर,नासिर भाई,अजहर देशमुख,अयाज अहमद,अब्दुल जहीर,अनिल इंगळे,सय्यद तौफिक,साहेबराव तायडे,गजानन लेडस्कर,उमेश नितवणे,करण नितवणे,शंकर म्हस्के,अमोल मानकर,शेख जुनेद, सय्यद अफरोज, प्रमोद पाटील,ऍड भालेराव,बब्बु भाई, सलाम खा व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Add Comment