धनगर समाज बांधवांची मागणी;उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन.
जळगांव जामोद,दि.२७(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षणाची मागणी समाज बांधवानी मुख्यमंत्र्यांकडे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनात केली आहे.
धनगर समाजाला भारतीय घटनेमध्ये एस.टी.प्रवर्गातून आरक्षण दिले गेले आहे.परंतु त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे आजही धनगर समाज मुख्य प्रवाहापासून वंचित आहे.यासाठी धनगर समाज अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे त्याच करिता जालना येथे दि. १७ पासून दीपक बोराडे उपोषणास बसलेले आहेत.परंतु सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली त्यामुळे दि. २६ रोजी जळगाव तालुक्यातील धनगर समाज बांधव यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाला एसटी सवलतीचे आरक्षण अंमलबजावणी करीता निवेदन दिले.
निवेदन देतांना चंदा पुंडे ज्येष्ठ नेत्या,अशोक साबे तालुकाध्यक्ष धनगर समाज महासंघ,युवा नेते दिलीप भिवटे, शुभम बोळे तालुकाध्यक्ष मल्हार सेना, विठ्ठल पाचपोर, भागवत खाळपे, शिवदास सोनोने,अरुण बोळे,हरिदास वाघमारे,संजय फासे, गणेश साबे,प्रमोद तितरे,अमित भिवटे,सरपंच निलेश साबे, विठ्ठल सुशिर,बळीराम पुंडे, अंबादास वसतकार,ईश्वर घुले, वासुदेव लोणाग्रे,विठ्ठल कवळे,सागर बोळे,निलेश खाळपे, राजू साबे,अर्जुन घोंगे, अमोल बोंद्रे,सुनील खाळपे,एकनाथ साबे,देवलाल डांगे, नामदेव पुंडे,सुभाष खाळपे,रामचंद्र मोळे यांच्यासह बहुसंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते.
Add Comment