political party देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

माळसावरगाव कृषी समृद्धी नव नगराला लवकरच मिळणार मुहूर्त!

Spread the love

डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नांना यश.

देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या समृद्धीत भर पडली आहे.जिल्ह्यातून सुमारे ८९ किमी किलोमीटर लांबीचा रस्ता गेला असून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात माळसावरगाव (माळसावरगाव,निमखेड,गोळेगाव) येथे कृषी समृद्धी नवनगराची निर्मिती होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.यासंदर्भात दि.१३ रोजी  विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या मागणीवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री(सा.ऊ) ना.दादा भुसे यांनी बैठक बोलावली असून  प्रस्तावित माळसावरगांव (माळसावरगांव,निमखेड,गोळेगाव) कृषीसमृद्धी नवनगरा मार्ग मोकळा होण्याचे संकेत दिसत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या नवनगराच्या निर्मितीची फाईल धूळखात पडली होती.सत्तांतर झाल्यानंतर लगेचच माजी आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी पुढाकार घेत खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नवनगर निर्मितीला चालना देण्याबाबत मागणी करून पाठपुरावा केला.  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान नियोजित थांबा नसतांना सुद्धा डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या आग्रहाखातर ते पळसखेड मलकदेव येथे थांबले व डॉ.शशिकांत खेडेकर यांच्याकडून सत्कार स्वीकारला.यावेळी सुद्धा माजी आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना नवनगराबाबत निवेदन दिले.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ दखल घेत नवनगराच्या प्रकल्पास चालना देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.मात्र शासन दरबारी डॉ.खेडेकर यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला.त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून १२ फेब्रुवारी रोजी अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग, सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुख्य नियोजन कार, मुख्य अभियंता व संबंधित अधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक  संपन्न होणार आहे.त्यामुळे स्मार्ट सिटी च स्वप्न प्रत्यक्षात येण्याचे संकेत दिसत आहे.

“कृषी समृद्धी नवनगराच्या निर्मितीमुळे मतदार संघातील विकासाला चालना मिळणार असून बेरोजगारी कमी होऊन पायाभूत सोई सुविधांमध्ये वाढ होणार आहे.”

 (माजी.आ.डॉ. शशिकांत खेडेकर)

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!