Front Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगांव जामोद मध्ये काँग्रेस चे “डफडे बजाव आंदोलन”

Spread the love

उपविभागीय कार्यालयाला टाळे ठोको आंदोलनाचा दिला इशारा.

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

जळगांव जा. शहरातील पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त व घरकुल लाभार्थी नागरिक तसेच कचरा संकलन, साफसफाई व अंगणवाडी च्या समस्या त्वरित निकाली काढाव्या ह्या व ईतर विविध मागण्यासाठी “डफडे बजाओ आंदोलन व मोर्चा”  दि.१५ ला दुर्गा चौकतुन सुरू होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगांव जामोद येथे धडकला.

पूरग्रस्त तथा शेतकरी यांना होणारा  त्रास लक्षात घेता शासनाने सरसकट मदत लवकरात लवकर शेतकरी तथा आपदग्रस्त यांच्या खात्यात वर्ग करावी, पूरपरिस्थितीत अनेक दुकानदाराचे नुकसान झाले त्यांना अद्याप मदत मिळाली नाही असे सांगत डॉ.स्वाती वाकेकर यांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले.

यापुढे शासनाने येत्या ४ दिवसात कार्यवाही केली नाही तर शासकीय कार्यालयाला टाळे ठोकल्या शिवाय राहणार नाही असा इशारा प्रकाश पाटील यांनी दिला.महिलांच्या शहराध्यक्ष मीना सातव यांनी शहरातील घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे थकीत अनुदानाचे हप्ते विना विलंब देण्यात यावेत व नवीन अर्ज स्विकारण्यात यावे यात हलगर्जी पणा करू नये असे सांगितले.

या डफडे बजाओ आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगांव जा. मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.स्वाती वाकेकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रकाश पाटील,  जिल्हा सरचिटणीस ऍड.अमर पाचपोर, तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, शहराध्यक्ष अर्जुन घोलप, महीला शहराध्यक्ष मिना सातव, डॉ. प्रशांत राजपूत, नगरसेवक श्रीकृष्ण केदार, ऍड.संदिप मानकर, कलीम खान, तसेच अजहर देशमुख, अब्दुल जहीर, प्रमोद तितरे, इमरान भाई, नासीर भाई, विजय हिस्सल, अन्सार बाबूसाहेब,अयाज भाई, शमीम भाई, प्रल्हाद राऊत,अनिल इंगळे, जुनेद शेख, देशमुख चाचा, खान घडीवाले, हुसेन राही, गुड्डू भाई, अफरोज भाई, तौफिक भाई,  मिलिंद वानखडे, अमोल मानकर,जुबेर पटेल, संतोष गावंडे,धनंजय बंबटकार,राजाभाऊ कोकाटे, सुरेश मानकर, गजानन साबळे, अस्लम भाई, संजय इंगळे, महेंद्र बोडखे, सलीम शहा,ॲड.रतन इंगळे, अमोल वसतकार, दिनेश काटकर, सुरेश वानखडे, कादर खान, विनोद बोपले, गजानन इंगळे, मुजाहि्द,शेख मुस्तफा, मुज्जमील बेग,सै.शारिक, राजा भाई, समु जहागिरदार,  चरणसिंग सोळंके,विठ्ठल डांगे, सलीम शहा, शंकर म्हस्के, सरस्वती म्हस्के, ओ.पी.तायडे, गजानन कोथळकर, डॉ.शालिग्राम कपले, श्रीराम मिसाळ,गजानन अवचार, गजानन सुर्यवंशी, सुनिल कळस्कार, नितीन सातव, सचिन जाधव, मंगेश जामोदे, मुश्ताक भाई , मन्सूर भाई, प्रल्हाद राऊत,बाळू हिस्सल, राजू काळपांडे,वंदना गिऱ्हे , मारोती कतोरे,विमल भगत, बिर्जा कौर, जिजाबाई दाभाडे,निता वानखडे,गजानन कतोरे यांच्यासह शहरातील व तालुक्यातील पूरग्रस्त,अतिवृष्टीग्रस्त,घरकुल चे वंचित लाभार्थी तसेच शेतकरी व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!