जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :
जळगांव जामोद मतदारसंघातील रस्ते व पुलांची सुमारे ५०० कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे,पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. आ डॉ संजय कुटे यांनी रस्ते बांधकाम बाबत विशेष नियोजन केले होते त्या नुसार राज्य महामार्ग व ग्रामीण भागातील रस्ते व पुल बांधकामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांचे कड़े मतदारसंघातील रस्ते व पुल बांधकामाच्या कामांना निधी मिळावा या करीता पाठपुरावा केला होता. त्यानुसार त्यातील तब्बल ५०० कोटिंच्या विकास कामांना या पुरवणी मागण्यांमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
ए.डी.बी योजने अंतर्गत जळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्यातील करणवाड़ी ते सोनाळा ते जिल्हासीमा पर्यंत रस्त्याच्या कामाकरीता सुमारे ४०० कोटि रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात जळगाव जामोद तालुक्यातील करणवाड़ी ते खांडवी हा १० किमी चा रस्ता व जळगाव जामोद ते सोनाळा ते जील्हा सीमेपर्यंत ३० किमी चा रस्ता अश्या पुर्ण ४० किलोमीटरच्या प्रशस्त रस्त्याचं बांधकाम करण्यात येणार आहे.
या रस्त्यामुळे करणवाड़ी, पिंपळगाव क़ाळे, खांडवी, सुनगांव, जामोद, करमोडा, लाडनापुर, टुनकी, सोनाळा व वारखेड या गावातील नागरिकांसह मतदारसंघातील जनतेला सुविधा मिळणार आहे. यासह आदिवासी क्षेत्रतील रस्ते व पुल बांधकामासाठी २२ कोटि मंजूर करण्यात आले आहेत तर राज्य मार्ग व ग्रामीण मार्ग बांधकामासाठी ७३ कोटि मंजूर करण्यात आले आहेत. या भरीव निधीमुळे मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे पुर्ण होणार आहेत.
“रस्ते चांगले असले तर जनतेचा वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत होते.त्यामुळे गेल्या वर्षभरात या बाबतीत विशेष नियोजन केले होते. हिवाळी अधिवेशनात ५०० कोटिंचा निधी रस्ते व पुल बांधकाम करण्यासाठी मंजूर झाल्याचे समाधान आहे.”
आ.डॉ.संजय कुटे.

Add Comment