Agriculture News Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत द्यावी.

Spread the love

वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन.

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची मदत मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

सतंतधार अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान केले आहे. जुलै महीन्यातील पुराने तालुक्यातील शेतीचे कधीही न भरुन येणारे नुकसान केले.तिच भरपाई अजुन मिळाली नाही, तुटक्या भरपाई साठी शेतक-यांना खेटे घ्यावे लागत आहे. ई के वाय सी यंत्रणा बंद पडली आहे.तर सुल्तानी संकटानंतर अस्मानी संकट येवुन ठाकले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परवाच्या अवकाळी पावसाने हिरावला गेल्याने तातडीने मदत देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन देतांना तालुकाध्यक्ष संतोष गवई,स्वप्नील गवई,देवाभाऊ दामोदर,साहेबराव भगत,श्रीकृष्ण गवई, जगदीश हातेकर, प्रा. सुभाष सिरसाट,नारायण पारवे,अमोल तायडे,महादेव बोदडे, बाबुराव पवार, श्रीराम भिडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!