Agriculture News Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या त्वरित दुरुस्त करा.

Spread the love

जळगांव जामोद : शिवसेना ठाकरे गटाची मागणी.

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

जळगाव जामोद, संग्रामपुर तालुक्यात २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याने त्या त्वरित दुरुस्त करण्याची मागणी शिवसेना(ठाकरे गट) च्या वतीने निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

शेतीपिकाचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले असून महापुरात  हजारो लोक बेघर झाली.गुरेढोरे सुद्धा मोठ्या प्रमानात मृत पावली आहेत.नुकसानग्रस्त व आपदग्रस्त भागाला आमदार, खासदार,सर्व पक्षीय नेत्यांनी भेटी दिल्या.शासन व लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत मिळेल या आशेत शेतकरी वाट पाहुन होते.

काही दिवसांपूर्वी प्रशासनाने आपद्ग्रस्तांच्या  मदतीच्या याद्या जाहिर केल्या.यामधे नदी,नाल्या काठी असलेल्या शेतकऱ्यांची नावे यादीत नाहीत. निधी वाटपात प्रत्यक्ष नुकसानग्रस्तावर अन्याय होऊन वाटपात खुप मोठी तफावत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे पुरग्रंस्तामधे असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी दि.३० रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी त्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी याद्यामधे झालेल्या घोळाचा जाब शिवसेनेचे जळगाव तालुका प्रमुख गजानन वाघ आणि जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्तात्रय पाटील यांनी प्रशासनाला विचारला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ, बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख दत्तात्रय पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, भीमराव पाटील, मुस्ताक भाईजान, शुभम पाटील यांच्यासह शेतकरी तथा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!