जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तीन राज्यांत भाजपाने जबरदस्त बाजी मारली असुन स्वबळावर बहुमताने विजय मिळवून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. या विजयाचा दि.३ रोजी आमदार डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात शहरातील दुर्गा चौक येथे फटाक्यांच्या आतिषबाजीसह जल्लोष करण्यात आला.भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचा जयघोष करत दुर्गा चौकासह संपूर्ण जळगांव शहरातील परिसर दणाणून सोडला होता.आ. डॉ. संजय कुटे व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.
“तिन्ही राज्यातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून लोकमताचा स्पष्ट कौल भाजपला दिला आहे तिन्ही राज्यात स्वबळावर भाजपा सत्ता स्थापन करणार आहे, त्यामुळे हा विजय म्हणजे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील आगामी महाविजय-२०२४ च्या विजयाची नांदीच आहे.”
डॉ संजय कुटे (आमदार, जळगांव जामोद)
जल्लोष साजरा करण्यासाठी आ.डॉ.संजय कुटे,भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,अनिल जयस्वाल, डॉ.अपर्णा कुटे,लता तायडे,चंदा पुंडे, कृ.उ.बा.स.संचालक मनोज राठी,निलेश शर्मा,परीक्षित ठाकरे,संजय चोपडे,राम इंगळे,शकिर खान,गोटू खत्ती यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Add Comment